वाहनमालकांनी 15 दिवसात संपर्क साधावा...अन्यथा बेवारस वाहनांचा होणार लिलाव..!


वाहनमालकांनी 15 दिवसात संपर्क साधावा...अन्यथा
बेवारस वाहनांचा होणार लिलाव..!
महाशाही न्यूज मराठी बार्शी 
बार्शी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली बेवारस वाहने ऑटो रिक्षा , दुचाकी  आणि इतर वाहनांच्या  मालकांनी आपआपली योग्य कागदपत्रे सादर करून तसेच नियमानुसार जी असेल ती शुल्क भरून आपली वाहने 15 दिवसांच्या आत पोलीस ठाण्यातून घेऊन जावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले की, बेवारस वाहनांची यादी पोलीस ठाणेआणि तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. त्यानुसार  वाहनमालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज सादर करून आपले वाहन आसल्याचा पुरावा सादर करून वाहन घेऊन जावे.

जर 15 मे 2025 पर्यंत ज्या वाहनांवर कोणीही हक्क सांगितला नाही, तर शासकीय नियमानुसार या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सदरील बेवारस वाहनांबाबत अधिक माहितीसाठी बार्शी शहर पोलिस ठाणे [ 02184 - 2222333 ] पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे [ मो. नं. 9503785090 ] आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कदम [ मो. नं. 8669502296 ] यांच्याशी संपर्क साधवा .

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..