एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना मुख्यमंत्री बनवू , काँग्रेसच्या गोटातून ऑफर..!
[ महाशाही न्यूज मराठी ]
लोकसभा विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या तरी देखील नेत्यांचं पक्षांतरच वार काही थांबत नाही. त्यात नेते मंडळी नाराज असल्याच्या चर्चा ही कांनी पडत आहेत, अशातच आज होळीच्या सणा दिवशी एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या नेत्यांने आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू , अशी खुली ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले की , "अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही ? याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात त्यांनी ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचेच काम भाजपने केलं आहे.
एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत," असं नाना पटोले यांनी म्हटलं.
अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपच्या अधिपत्याखाली हे दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून आम्ही मुख्यमंत्री बनवून टाकू, आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवरती भाजपवर केलेल्या टीकेवर भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. पटोलेंच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
परंतु जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत ही नेतेमंडळी कुठेही जाणार नाहीत. तेथील ईडीच्या फटक्याची सगळ्यांनाच भीती आहे. त्यामुळे हे धाडस कुणीच करणार नाही," असे बच्चू कडू यांनी म्हंटलेआहे..
लोकसभा विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या तरी देखील नेत्यांचं पक्षांतरच वार काही थांबत नाही. त्यात नेते मंडळी नाराज असल्याच्या चर्चा ही कांनी पडत आहेत, अशातच आज होळीच्या सणा दिवशी एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या नेत्यांने आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू , अशी खुली ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले की , "अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही ? याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात त्यांनी ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचेच काम भाजपने केलं आहे.
एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत," असं नाना पटोले यांनी म्हटलं.
अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपच्या अधिपत्याखाली हे दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून आम्ही मुख्यमंत्री बनवून टाकू, आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवरती भाजपवर केलेल्या टीकेवर भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. पटोलेंच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
परंतु जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत ही नेतेमंडळी कुठेही जाणार नाहीत. तेथील ईडीच्या फटक्याची सगळ्यांनाच भीती आहे. त्यामुळे हे धाडस कुणीच करणार नाही," असे बच्चू कडू यांनी म्हंटलेआहे..


